Skip to main content

Why you don't need "Original" Aaadhar Card anymore ! ( Marathi Text )

आधार "कार्ड " ( !) आणि त्याची सक्ती आहे की नाही या विषयावर रोज नवीन नवीन बातम्या येत आहेत. केंद्र सरकारने  मध्ये वेळो वेळी "आधार नोंदणी सक्तीची नाही आणि कुठलेही सरकारी लाभ/सुविधा केवळ आधार क्रमांक ( मी मुद्दाम "क्रमांक" असा शब्द वापरत आहे ) नाही म्हणून नाकारता  येणार नाहीत " असे स्पष्ट करून सुद्धा अजून   गोंधळ कायम आहे . महाराष्ट्रात तर " सुविधा नको पण आधार सक्ती आवर " अशी वेळ आली आहे . आधार कार्ड  एजन्सी साठी कंत्राट घेताना विविध कंपन्यान्नी आधार नोंदणी केंद्र स्थापन करून कार्ड साठी माहिती जमा करताना  होणारा खर्च आणि प्रत्येक क्रमांकाची माहिती  UIDAI  कडे जमा करून मिळणारा मोबदला यातून होणारा नफा यांचा ताळमेळ बिघडू नये म्हणून एकीकडे आधार ची सक्ती नाही सांगायचे पण दुसरी कडे विविध योजनांचे लाभ  देताना आधार कार्ड मागायचे असा सरकारचा दुटप्पी पणा दिसतो. आधार सक्ती केली नाही तर लोक नोंदणी करणार नाहीत आणि मग या कम्पन्या ना  फायदा झाला नाही तर निवडणुकीला पैसा त्या देणार नाहीत असा एकंदर हिशेब असावा .
 
  आज कुठल्याही सरकारी विभागात गेलात तरी " Original" ( !)  आधार "कार्ड" मागतात ! आणि विचारले की "ओरिजिनल " म्हणजे काय तर म्हणे पोस्टाने आलेले "रंगीत" आधार "कार्ड" . बरे नुसते "कार्ड" ( म्हणजे आधार पत्राच्या खालचा कापता येण्या सारखा भाग ) चालत नाही तर " पूर्ण" पत्र लागते !आता या सरकारी बाबू लोकांच्या अज्ञानाला हसावे कि रडावे तेच कळत नाही .
 
सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे कि "आधार" हा प्रत्येक व्यक्तीचा "ओळख क्रमांक " आहे कि ज्याच्या संदर्भाने भारत सरकारच्या  UIDAI प्राधिकरणाकडे असलेल्या डेटाबेस मधून त्या व्यक्तीची बायो मेट्रिक ( हातांचे ठसे ,रेटीना स्क्यान )तसेच  KYC ( रहिवासाचा तसेच ओळखीचा पुरावा )वगैरे माहिती शोधून काढून ती पडताळता येईल . त्यामुळे खरे पाहता कुठलाही सरकारी फॉर्म भरताना त्या व्यक्तीने नुसता आधार क्रमांक लिहिला तरी चालणार आहे . तसेच जर एखाद्या सरकारी खात्याकडे  UIDAI  च्या डेटाबेस चा Access नसेल तर त्या खात्यांनी तसा स्वतंत्र करार  UIDAI  शी करणे अपेक्षित आहे आणि तो पर्यंत त्या खात्यांना आधार क्रमांकाचा शून्य उपयोग आहे ! हल्ली ओळखीचा आणि पत्याचा पुरावा म्हणून महाराष्ट्रा मध्ये नेहमीच्या पासपोर्ट,रेशन कार्ड ( हे आहेच अजून चालू बरे का ),PAN कार्ड ,लाईट बिल वगैरे घेतात ते घेतातच पण अजून एक आधार चे "ओरिजिनल " "रंगीत " कार्ड " सुद्धा मागतात !ज्याची खरे पाहता गरज नाही .
 
          आता  वळूया "ओरिजिनल" कार्ड विषयाकडे . भारतीय पोष्टाच्या गलथान कारभारामुळे अजूनही बर्याच जणांना नोंदणी करून  सुद्धा महिनोन महिने आधार क्रमांकाचे पत्र पोष्टाने मिळत नाही आणि सरकारने ऑन लाईन उपलब्ध करून दिलेल्या ई -आधार चा प्रिंट आउट सरकारी बाबू "ओरिजिनल" मानत नाहीत .  परंतु  UIDAI  हा ज्या नियोजन आयोगाचा भाग आहे त्या नियोजन आयोगाने आपल्या २ ८  मार्च २ ० १ ३  रोजीच्या पत्रकामध्ये ( संदर्भ क्रमांक : १ १ ० १ ४ / ८ /२ ० १ १ - Logistics )  ई - आधार चा प्रिंट आउट म्हणजे मान्य शासनमान्य आधार क्रमांकाचा  पुरावा असे नि: संशय नमूद केलेले आहे. सदर परिपत्रक http://aadhaar.maharashtra.gov.in/upload/e-aadhaarCircular[1].pdf  या संकेत स्थळावर पाहता येईल .
 
असे असताना ही  सरकारी बाबू सामान्य माणसाला आधार च्या "ओरिजिनल" "कार्ड" (!) साठी का त्रास  देतात हे उघड गुपित आहे !

Comments

Popular posts from this blog

आय टी चे मृगजळ : काय सत्य काय असत्य !! मराठी पालकांनी करावे तरी काय ?

( प्रस्तुत लेखक स्वतः एका बहुराष्ट्रीय आय टी कम्पनी मध्ये कार्यरत असून ,या क्षेत्राचा १५ वर्षे अनुभव आहे .लेखात व्यक्त केलेली मते वैयक्तिक आहेत. काही मुद्दे कठोर भाषेत मांडले आहेत .यात कुठल्याही व्यवसायाचा अथवा व्यावसायिकाचा वैयक्तिक उपमर्द करण्याचा हेतू नाही .आपल्या मुलाला अथवा मुलीला "आय टी " क्षेत्रात पाठवायला बघत असाल तर नक्कीच वाचा आणि आपल्या पाल्याला वाचायला द्या .लेखाचा विषय तांत्रिक असल्याने जिकडे योग्य मराठी प्रमाण प्रतिशब्द मिळाले नाहीत तिकडे मूळ तांत्रिक संज्ञा वापरल्या आहेत ) आय टी  चे मृगजळ : काय सत्य काय असत्य  सध्या वर्तमानपत्र उघडले की आय टी क्षेत्रात मंदी आहे आणि हजारो लोकांचे रोजगार जाणार अश्या बातम्या दिसतात . अमेरिकेने आणि इतर देशांनी व्हिसा चे नियम कडक केले असल्याने भारतीय आय टी प्रोफेशनल्स च्या बऱ्याच संधी जाणार अशी ओरड सुद्धा दिसते . या दोन्ही मुद्द्यात नक्कीच तथ्य आहे .पण यासाठी सरसकट आय टी कम्पन्यांना किंवा अमेरिकन सरकार ला व्हिलन बनविण्याआधी काही बाबींचा सर्वांगीण परामर्श घेणे गरजेचे आहे .आपल्या आय टी क्षेत्रा बद्दलच्या क...

The Crazy Airline Pilot

Hi The great Sarkari Indian Airlines (Now Air India) has done it again!They took passengers ransom for their own mistakes and tantrums yesterday on IC 164 from Goa to Mumbai. I was the one who praised Indian Airlines when they did a fantastic job during the employee strike recently in June earlier this year.(Please refer to my Articles published in DNA newspaper on 15th June 2007 titled "Hats off to Indian Spirits" and in Hindustan Times the same day titled "Indian did a good job" ) However sunday's episode raises serious doubts on Indian Airlines' ability to perform as "customer caring /serving entity". It was a lazy Sunday afternoon (11th November 2007) in Goa and most of the Travellers were returning to their home destinations after spending a diwali holiday (being a long weekend) in Goa.Everyone had to join their offices/business the next day and hence preferred afternoon flights to go back which gives a relaxing evening at home before anothe...

No attestation and stamp paper needed for any government service or affidavit respectively in Maharashtra

Central government passed this order  in Sep 2014 and now Maharashtra Government followed... Maharashtra Government in a GR Dated 09th March 2015 categorically issued orders to all state government authorities and departments that here onwards no office will ask for attestation by SEO/Gazetted officers /school or college principal on any photocopy of any document. A simple self certification from applicant is sufficient .You can sign the photocopy and that's about it Also no affidavit here onwards will be needed to be done on a stamp paper ( though this order was in place since 2003,it was not practiced and people were still paying for stamp papers )except those cases where a law categorically needs a stamped affidavit .This is very important as many government officers used to insist at their will for an affidavit on stamp paper even if standard operating procedure of the law governing that citizen service didn't specifically mention any need for such a...